जालना: जालना शहराच्या पाणीपुरवठा समस्येवर मानवाधिकार आयोगाचे लक्ष; दररोज पाणीपुरवठ्यावर मनपाचे मौन, नेत्यांनी एकत्र येण्याची गर
Jalna, Jalna | Apr 13, 2026 जालना शहराच्या पाणीपुरवठा समस्येवर मानवाधिकार आयोगाचे लक्ष; दररोज पाणीपुरवठ्यावर मनपाचे मौन, नेत्यांनी एकत्र येण्याची गरज.. आज दिनांक 13 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराला भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले आहे. शहराला स्वच्छ, नियमित आणि दररोज पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी ॲड. अश्विनी महेश धन्नावत यांनी नोटरी असोसिएशन, जालनाचे कार्याध्यक्ष ॲड. महे