जालना: जालना तालुक्यात भीषण वनाग्नी; 200 एकर जंगल जळाले, पशु-पक्षांचे जीव धोक्यात; चौकशी व कारवाईची मागणी
Jalna, Jalna | Apr 25, 2026 जालना तालुक्यातील शंभू सावरगाव, ढगी, काकडा, मोहाडी आणि खांबेवाडी या गावांच्या शिवारात भीषण वनाग्नी लागून सुमारे 200 एकरांवरील जंगल जळून खाक झाले. शनिवार दि. 25 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या आगीत मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपत्ती नष्ट झाली असून वन्यजीवांनाही फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.