जळगाव तालुक्यातील लमांजन गावात मजुरीसाठी वास्तव्याला आलेल्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीचा, गिरणा नदीच्या काठावर आंघोळीसाठी गेला असता पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता ही दुर्घटना घडली. मात्र, रात्रभर शोध घेऊनही मृतदेह न सापडल्यामुळे अखेर बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.