अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वर्धा सोशल फोरम तथा काँग्रेस नेते डॉ. अभुदय मेघे यांच्या वतीने दिवाळी फराळ व साहित्याचे वाटप करण्यात आले. दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास क्षिरसमुद्र गावासह इतर अतिवृष्टीग्रस्त भागात जाऊन डॉ. मेघे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या घरी भेट देत वाटप केले.