राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असली, तरी ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी संघटना (शरद जोशी स्थापित) यांनी व्यक्त केली आहे.सरकारचं हे पाऊल ऐतिहासिक नसून शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण करणारे कृत्य असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मागील अतिवृष्टीच्या काळात दिलेल्या मदतीपेक्षा कमी दिली आहे.