आज रोहा तालुक्यातील नागोठणे येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी विचारांचा स्वीकार करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. अजितदादांनी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करून, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा मौल्यवान वारसा दिला. राजकारणात मूल्ये, संस्कार आणि विकास यांची सांगड कशी घालायची, हे त्यांनी शिकवले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.