मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी; महाराष्ट्र शासनाचे सतर्कतेचे आवाहन.. आज दिनांक 1 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. संबंधित देशांतील सर्व भारतीयांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय