५० वर्षात झाला ना येवढा पाऊस या वर्षी पडला. खरिपाची पिकं उध्वस्त झाली. सरकारने पत्रकार परिषदेत मोठ्या घोषणा केल्या खर्चा पण शासन निर्णय काढला तेव्हाच शेतकरयांची फसवणूक झाली होती. तुटपुंजी का होईना दिवाळीपूर्वी मदत मिळेल अशी आशा होती पण खात्यात एकही दमडी न टाकल्याने शेतकर्यांनी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध केला खरा पण जोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकारला किंमत समजणार नाही असे म्हणत उपोषणाचा इशारा दिला.