कामठी येथील परिसरात ७७ मीटर भव्य फ्लॅग रॅली (तिरंगा यात्रा) मोठ्या उत्साहात काढण्यात आली. 'इको-लॉजिकल फाउंडेशन' आणि 'ई-प्लॅनेट' यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाप्रती प्रेम आणि सामाजिक जनजागृती हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी आणि मान्यवरांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमाचे नेतृत्व प्रा. डॉ. अभिषेक चिमुणकर यांनी केले.