गुरुवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता च्या सुमारास प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची भंडारा जिल्हाधिकारी यांच्यासोबत प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली, पण या चर्चेतून कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने प्रकल्पग्रस्तांनी आता जलसमाधीचा निर्धार पक्का केला आहे. शासनाने तातडीने मागण्यांची दखल न घेतल्यास उद्या गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी झेलणाऱ्या वैनगंगेच्या पात्रात अनेक नागरिक जलसमाधी घेणार असल्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.