ठेकेदारांच्या कामाच्या दर्जावरून सरकारला होणारा त्रास आणि कामातील विलंबावर अजितदादांनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य केले. पिपंळी (ता. बारामती) येथील ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी गावातील विकासकामे, शेती आणि स्थानिक समस्यांवर मोकळेपणाने भाष्य केले.