जालना: दानवेंच्या सल्ल्याने चला,खोतकरांचं महापौर वंदना मगरेंना आवाहन,गोरंटयाल यांना डिवचण्याचा प्रयत्न
Jalna, Jalna | Apr 4, 2026 आज दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील राजकारणात आज पुन्हा नाटयमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत.रावसाहेब दानवे आणि माझ्यातील राजकीय वैर संपल्याची घोषणा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे.आज जालना-राजूर रोडवरील दोन किलोमीटर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन भाजप नेते रावसाहेब दानवे आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या वेळी आयोजित कार्यक्रमात खोतकरांनी ही घोषणा केली.कोणतीही ताकद आम्हाला आता वेगळं करू शकत नाही.आमच्यातील मतभेद संपले