यवतमाळ.. १९९४ मध्ये नागपूर येथे न्याय्य मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव हुतात्मा झाले होते. त्यांच्या बलिदानाची आठवण जपत समाजबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. पार्डी नस्करी येथे शहीद गोवारी बांधवांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करण्यात आली. श्री कवडुजी कोहरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि स्मारकाचे पूजन करण्यात आले. गोवारी समाज आजही आपल्या अस्तित्वासाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत असल्याचं समाजबांधवांनी यावेळी सांगितलं.