वर्धा: कर्जमाफी व नुकसानीचे पंचनामे करा व आर्थिक पॅकेज जाहीर करा मनसेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
Wardha, Wardha | Sep 22, 2025 मनसेने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत, हमीभावाने खरेदी केंद्रे, विशेष आर्थिक पॅकेज व कर्जमाफीच्या मागण्या केल्या. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अनियमित पाऊस, हवामानातील बदल व कीडरोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले.