भुसावळ शहरातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'अमृत योजने' अंतर्गत पाणी टाकीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून गूढरीत्या ठप्प आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत असून, या दिरंगाईविरोधात भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भाजप नगरसेवकांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात धडक देत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला आणि कामाच्या विलंबाबाबत जाब विचारला.