गडकुंभली येथे पाण्याची भीषण टंचाई,समस्या सोडवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना दिले महिलांनी निवेदन
साकोली तालुक्यातील गडकुंभली येथे गेल्या महिन्याभरापासून नळ योजना तसेच बोअरवेल बंद असल्याने पाण्याची भीषण टंचाई आहे. महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे त्यामुळे या पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी महिलांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती साकोली यांना निवेदन दिले आहे निवेदन देताना रोशनी नान्हे, बबीता राऊत ,कुंदा शहारे, सोनाली बरडे, योकला हटकर व गावातील महिलांची उपस्थिती होती