मुंबई: टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत असल्याची टिका
Mumbai, Mumbai City | Feb 14, 2024
आयारामांना उमेदवारी व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टिळक भवन येथे बुधवार, (ता.१४) फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिला आहे.