जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाने हल्ला करून शेतकऱ्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्राच्या शंकरपूर उपवन क्षेत्रातील डोमा बीट हद्दीत असलेल्या शिवरा गावाजवळ काल (दि. २६ ऑक्टोबर)रात्री ७ वाजता ही घटना घडली. नीलकंठ भुरे (वय ६०) रा. शिवरा या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, ते गावाचे माजी सरपंच होते. विशेष म्हणजे, एका महिन्याच्या कालावधीत परिसरात वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.