वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्धा जिल्हा आरटीओ विभागाने कंबर कसली आहे. रस्ता सुरक्षा मोहिमेच्या अंतर्गत आज पुलगाव शहरात एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 'हेल्मेट' आणि 'सुरक्षित ड्रायव्हिंग' हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यात आला. असल्याचे आज 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे