अयोध्या-प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या व सुरक्षित असलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विशेष रेल्वे आरक्षण बोगीद्वारे भाविकांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने रविवारी ७ डिसेंबर रोजी प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे.