नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांची झालेली हस्तांतरणे किंवा विभाजनांबाबतचे दस्तऐवज नोंदणीकृत झालेले असल्यास अशा हस्तांतरणाची अधिकार अभिलेखात नोंद करण्याबाबत शासनाच्या सूचना आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशी हस्तांतरणे किंवा विभाजने झाली असल्यास संबंधितांनी अभिलेखात नोंद करण्यासाठी तहसिल कार्यालयात कागदपत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.