जळगाव शहरातील नंदनवन नगर येथे विवाहिता आपल्या तीन वर्षाच्या मुलीला सोबत घेवून माहेरी जात असल्याचे सांगून घरातून कुठेतरी निघून गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.