अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रबोधन भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात माजी कृषिमंत्री शरद पवार आणि भीमराव आंबेडकर हे एकाच मंचावर आले. या उपस्थितीमुळे नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा रंगली. कार्यक्रमानंतर दुपारी ४ वाजता प्रतिक्रिया देताना भीमराव आंबेडकर यांनी हा सोहळा सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी असल्याचे सांगत राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले.