अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस बु परिसरात मुसळधार परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे तूर, कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांनी वेचणीसाठी आणलेले कपाशी पिक ओले होऊन नासधूस झाले असून, तूर पिक गळून गेले आहे. तर सततच्या पावसामुळे सोयाबीन पिक सडू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून शेतकऱ्याचे मोठ नुकसान झाले आहे.