सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित केली आहे.तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जे कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षापासून सेवा बजावत आहेत.त्यांचा अंत आता पाहू नये.अनेक रुग्णालय अपुऱ्या स्टाफ मुळे बंद राहतात.डॉक्टरांची कमतरता तीव्र असून आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती भयावह आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो.आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे.त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधांतरी ठेवणे योग्य नाही.