नववर्षाच्या सुरुवातीलाच वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत वर्ध्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्धा जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. या मॉलमुळे महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळणार असून, ग्रामीण महिलांच्या रोजगार व उद्योजकतेला मोठे बळ मिळणार आहे.ही माहिती दिनांक 2 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वा