समुद्रपूर: नारायणपूर येथे मोठ्या धार्मिक वातावरणात भागवत सप्ताहाचा समारोप:भागवत कथेला पन्नास वर्षांची परंपरा
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे गणेशपुर, गोविंदपूर, बल्लारपूर येथील संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने गेल्या पन्नास वर्षांपासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते आहे.आज सोमवारी ८ एप्रिलला ५ वाजता या सप्ताहाचा समारोप करण्यात आला.वै.पुरुषोत्तम महाराज ठाकरे राळेगाव यांनी सन 1976 मध्ये सदर कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हापासून आजतागायत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो विशेष म्हणजे या कार्यक्रमा करिता नारायणपूर बल्लारपूर ,गणेशापुर ,गोविंदपूर येथिल ग्रामस्थ सहभागी झाले होते.