महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील रावढळ–कोसबी येथे संरक्षण भिंत बांधणे तसेच जेटी दुरुस्ती या महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संरक्षण भिंतीमुळे समुद्रातील भरतीचे खारे पाणी शेतजमिनीत येणार नाही, त्यामुळे शेती व पिकांचे होणारे नुकसान थांबेल. तसेच जेटी दुरुस्तीमुळे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाणे सुलभ होणार असून मच्छीमार बांधवांना तसेच स्थानिक व्यावसायिकांना मोठा लाभ होणार आहे. या विकासकामांमुळे परिसराच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.