"आम्ही शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब महिला आहोत, सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि केवायसी पूर्ण करूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मागील दोन महिन्यांचे पैसे आमच्या खात्यात का जमा झाले नाहीत?" असा संतप्त सवाल करत आज, १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २:०० वाजेच्या सुमारास भंडारा शहरातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत महिलांनी थेट कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले, तर काही काळ नागपूर नाक्यावर रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.