भंडारा-तुमसर राष्ट्रीय महामार्गाच्या अत्यंत बिकट अवस्थेमुळे अखील भारतीय माळी महासंघ, भंडारा जिल्हा शाखेने थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे, उखडलेला डांबरी थर आणि अपुरी जलनिस्सारण व्यवस्था यामुळे दररोज हजारो प्रवाशांसह रुग्णवाहिकांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, परिणामी अनेक अपघात घडले असून निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. महासंघाने तक्रारी करूनही केवळ तात्पुरती मातीमिश्रित दुरुस्ती करून वेळ मारून नेल्याचा..