वर्धा शहरात दिवाळीपूर्वी बाजारपेठेत गर्दी दिसत असली, तरी मोठ्या खरेदीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचे चित्र दिसत आहे.“सोयाबीन गेले, आहे त्याला भाव नाही, खर्चही निघाला नाही — दिवाळी कशी साजरी करायची?” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे बाजारातील विक्रीवर थेट परिणाम झाला असून, केवळ लक्ष्मीपूजनापुरतीच खरेदी होत असल्याचे चित्र आहे.