समुद्रपूर: भाऊबीजेच्या रात्री शेताच्या बांधावर गळफास घेऊन शेतकरी पुत्राची आत्महत्या: सावरखेडा येथील घटना
समुद्रपूर: भाऊबीजच्या रात्री सगळीकडे बहिण भावाला ओवाळनी घालत असताना सावखेडा गावातील २५ वर्षीय तरुणाने आपल्या शेताच्या बांधावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भाऊबीजच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सावरखेडा येथील शेतकरी नथुजी राऊत यांचा मुलगा हर्षल राऊत हा घरून जेवन करून निघून गेले त्याने थेट शेत गाठून स्वताच्या अंगातील टीशर्ट काढून बांधावरील झाळाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.