कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ओम साई नगर येथील अगरबत्ती कारखान्याला अचानक भीषण आग लागली. आग लागण्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच तात्काळ अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. व आग विझविण्यास सुरुवात केली. तब्बल तीन तासानंतर आग वर नियंत्रण मिळविण्यात आले. या आग मध्ये अगरबत्ती, भुसा, दोन मशीन व इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे यामध्ये पाच लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.