हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वाई गावात नळाला चार दिवसांपासून पाणी न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. दिवाळीसारखा सण असतानाही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या निषेधार्थ गावातील युवकांनी दीपावळीच्या दिवशी ग्रामपंचायतीसमोर 'उटणे' लावून एक अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले. अशी माहिती आज दिनांक 21 ऑक्टोबर वार मंगळवारी सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे