रायगड जिल्ह्यात अजूनपर्यंत तरी कोणतीही मच्छिमार नौका बेपत्ता नसल्याचे मच्छिमार, मच्छिमार संस्था तसेच मत्स्य परवाना अधिकारी, श्रीवर्धन, मुरुड जंजिरा, अलिबाग, उरण यांनी सांगितले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने सर्व मच्छिमार सहकारी संस्थांना सतर्कतेचा इशारा दिलेला असून मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा सूचना केल्या आहेत. उरण तालुक्यातील 450 नौका बंदरात उभ्या आहेत. तसेच करंजा, ता उरण येथील 5 नौका समुद्रातून बंदराकडे येण्यास निघाल्या असुन त्या संध्याकाळपर्यंत बंदरात परत येतील असे चेअरमन, करंजा सोसायटी यांनी सांगितले आहे. मुरुड जंजिरा तालुक्यातील 700 नौका,श्रीवर्धन तालुक्यातील 1019 नौका व अलिबाग तालुक्यातील 800 नौका बंदरात नांगरून उभ्या आहेत. अशी माहिती आज मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास रायगड मत्स्य व्यवसाय विभाग सहाय्यक आयुक्त यांनी दिली.