राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही समाधान वाटेल, असे मोठे वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केले आहे.सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.