गिरड खुर्सापार परीसरात गेल्या वर्षभऱ्यापासुन पाच वाघांनी कुठल्याही मनुष्यांवर हल्ला केला नसला तरी अनेक जनावरांची शिकार करून चांगली दहशत निर्माण केली होती.या वाघांच्या संबधी नागरीकांनी आमदार समिर कुणावार यांच्याकडे तक्रार केली.आमदार कुणावार यांनी घटनेचे गांभीर्य व नागरीकांची सुरक्षा लक्षात घेऊन भविष्यात कोणत्याही मनुष्य हाणी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,वनमंत्री गणेश तसेच वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पाचही वाघांना पकडण्याची आग्रही मागणी लावून धरली होती.