नागपूर ग्रामीण: भूजल पुनर्भरण आणि जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी भूजल पुनर्भरण आराखड्यानुसार निश्चित केलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. जलपुनर्भरण, नाले व नद्यांचे खोलीकरण आणि गाळमुक्त तलाव ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 'अटल भूजल' योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करून आवश्यक तिथे दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.