महाड तालुक्यातील वरंध येथील कुंभार कोंड परिसरात दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आपत्ती निवारण केंद्राच्या बांधकामाचा शुभारंभ आज बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. या नवीन आपत्ती निवारण शेडमुळे परिसरातील नैसर्गिक आपत्तीवेळी तात्काळ मदत, सुरक्षित निवारा आणि जलद प्रतिसाद या साठी मोठी बळकटी मिळणार आहे. विशेषतः महाड व आसपासच्या भागातील पूरपरिस्थिती आणि डोंगराळ भागातील जोखमीची परिस्थिती लक्षात घेता हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कार्यक्रमास विभागातील तसेच गावातील शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.