केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेअंतर्गत भुसावळ शहरात सुरू असलेल्या पाणी टाकीच्या संथ आणि अनाकलनीय कामाबद्दल माजी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनी सोमवारी 5 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम ठप्प असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून, प्रशासनाच्या या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.