ग्रामीण भागातील करोडो लोकांना रोजगार देणारी मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बंद करण्याचे षडयंत्र भाजप सरकार रचत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.मनरेगा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजप सरकार ही योजना बंद करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मात्र भ्रष्टाचाराचा आरोप पुढे करून प्रत्यक्षात गरीब, शेतमजूर व ग्रामीण कुटुंबांचा रोजगार हिरावून घेण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.