जालना: बदनापूरच्या चिखली येथील शेतजमिनीच्या ताब्यासाठी दुर्गुळे कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
Jalna, Jalna | Apr 20, 2026 बदनापूर तालुक्यातील चिखली येथील शेतजमिनीचा ताबा मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या दुर्गुळे कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलंय. सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी मोजणी होऊनही प्रत्यक्ष ताबा न मिळाल्याने तसेच शेजारील शेतकर्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. द्वार्कीनाथ काशिनाथ दुर्गुळे व त्यांचे कुटुंबीय मंगलबाई द्वार्कीनाथ दुर्गुळे, विनायक द्वार्कीनाथ दुर्गुळे आदींनी निवेदन दिले.