हिंगणघाट ग्रामीण विभागातील अनेक गावांमध्ये शासनाकडून भरणारे विज बिल वेळीच न भरल्याने अनेक गाव संपूर्ण परिसर अंधारात गेला आहे. महावितरणचे बिल थकीत राहिल्याने गावातील सर्व पथदिवे बंद करण्यात आले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पथदिव्याचा विज बिल भरणा हा पुर्वीपासून जिल्हा परिषद करीत होती.मात्र शासनाने विज बिलाचा भरणा केला नसुन ग्रामपंचायतीने करावा असा फरमान काढला आहे.ग्रामपंचायतीची आर्थिक आवक कमी आहे यातच आता पथदिव्याचे बिल कुटुन भरायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.