अकोला येथील लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर ‘वंदे मातरम’ गीताच्या रचनेच्या १५० व्या वर्षानिमित्त हजारो विद्यार्थी व तरुणांनी सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम’चे गायन केले. स्वातंत्र्य सेनानी व कवी बंकिमचंद्र चटर्जी यांच्या अमर रचनेला अभिवादन म्हणून हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, सहायक उपायुक्त दत्तात्रय ठाकरे आधी यावेळी उपस्थित होते.