वंचित बहुजन आघाडीच्या भंडारा जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊन, गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. दिनांक २४, २५, २७, २९, आणि ३० ऑक्टोबर रोजी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे, अंतिम टप्प्यात आलेले खरीप पीक, विशेषतः कापणी केलेले आणि सुकवण्यासाठी ठेवलेले धान अक्षरशः भिजून पूर्णपणे खराब झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिराव