नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे या पत्राद्वारे राज यांनी मुख्यमंत्र्यांचे एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर लक्ष वेधले आहे. अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा घडवून आणावी आणि काहीतरी ठोस कृती करावी अशी महाराष्ट्रातील जनतेची तुमच्याकडून अपेक्षा आहे असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 डिसेंबरला दुपारी एक वाजता यावर प्रतिक्रिया दिली आहे