दिग्रस शहरातील चांद नगर भागात नाल्यांची गुरुवारी साफसफाई करण्यात आली. मात्र नाल्यातून काढलेला गाळ रस्त्यालगतच टाकून दिल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. आज दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा गाळ उचलल्या न गेल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असून डास-माश्यांचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे. नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी नाल्यांची स्वच्छता केल्यानंतर गाळ त्वरित उचलण्याची प्रक्रिया मात्र झाली नाही.