नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवार, २५ डिसेंबरपासून अधिकृतपणे सुरू झाला असून, या ऐतिहासिक विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी उभारलेल्या सर्वपक्षीय नामकरण कृती समितीची ठाम भूमिका असल्याचे समितीचे उपाध्यक्ष व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मांडली आहे. विमानतळ सुरू झाल्यामुळे या संपूर्ण विभागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून उद्योग, व्यापार आणि आर्थिक विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, “हा विमानतळ केवळ वाहतुकीचा केंद्रबिंदू नसून, नवी मुंबई व रायगड जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे.