: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु असल्याने बिबट्याचा वावर मानवी वस्तीकडे होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नुकताच कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच बिबट्याला ताब्यात घेतले जाईल असे, वनविभागाचे उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी दिली माहिती