चिखली: शेतात पाणी देताना आयुष्याचा अंत; कर्ज, चिंता की हतबलता? चिखली तालुक्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
अंत्रीखेडेकर येथे मका पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.रतन लक्ष्मण चांदले (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदले हे आपल्या मेरा बु. भाग २ मधील गट क्रमांक १०८३ या शेतात मका पिकाला पाणी देत होते. दरम्यान, अज्ञात कारणामुळे त्यांनी शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.